शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक घेऊ -राजू शेट्टी यांची ग्वाही : पाण्यावरून संघर्ष दुर्दैवी; इचलकरंजी नगरपालिकेत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:29 IST

इचलकरंजी : वारणा धरण प्रकल्पात शेती सिंचनाला ‘पुरून उरेल’ इतका पाणीसाठा असल्याचा विश्वास शासनाने वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांना दिला पाहिजे.

इचलकरंजी : वारणा धरण प्रकल्पात शेती सिंचनाला ‘पुरून उरेल’ इतका पाणीसाठा असल्याचा विश्वास शासनाने वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांना दिला पाहिजे. त्याचबरोबर इचलकरंजी शहराला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रमुख नेत्यांची तातडीने बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

इचलकरंजीला वारणा नदीतून पाणी देण्यासाठी वारणा बचाव कृती समिती व इचलकरंजीवासीय अशा दोन्ही बाजूंनी आंदोलनाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात नगरपालिकेतील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत खासदार शेट्टी बोलत होते. नगराध्यक्षा स्वामी यांनी आयोजित केलेल्या मंगळवार (दि. ८)च्या सर्वपक्षीय बैठकीला शेट्टी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी गुरुवारी नगरपालिकेमध्ये येऊन नगराध्यक्षा व नगरसेवकांशी संवाद साधला.

वारणेच्या पाण्यासाठी सध्या सुरू असलेला संघर्ष दुर्दैवी आहे, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, वारणा धरणामध्ये सहा ते सात टीएमसी पाणी अतिरिक्त असल्यामुळे मान्सून पाऊस सुरू होत असताना सोडून द्यावे लागते. वारणाकाठच्या लोकांना शासनाच्या जलसंपदा खात्याकडील अधिकाऱ्यांनी धरणामध्ये अतिरिक्त पाणी असल्याचा विश्वास पटवून दिला पाहिजे. ज्यामुळे इचलकरंजीला पाणी दिल्यास वारणाकाठच्या शेतकºयांची फसवणूक होणार नाही, हा दिलासा मिळेल, असेही शेट्टी यांनी सांगितले.

सुरुवातीला पाणीपुरवठा समितीचे सभापती नितीन जांभळे यांनी स्वागत केले. जलअभियंता अजित साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. शशांक बावचकर म्हणाले, वारणा धरणात आरक्षित असलेल्या पिण्याच्या पाण्यापैकी एक टीएमसी पाणी शासनाने आरक्षित केले आहे. तेच पाणी मिळावे, अशी आमची मागणी आहे. विठ्ठल चोपडे म्हणाले, पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये एकट्या इचलकरंजीचाच समावेश नसून, कोल्हापूर शहरासह ग्रामीण परिसर व औद्योगिक वसाहतींचा त्यामध्ये सहभाग आहे. सागर चाळके यांनी, वारणा बचाव कृती समितीने विरोध करताना टोकाची भूमिका घेतली आहे, असे विषद केले. बैठकीमध्ये अजित जाधव, तानाजी पोवार, रवींद्र माने, आदींनीही हक्काचे असलेले वारणा नदीतील पाणी मिळावे, अशी मागणी मांडली. बैठकीला नगरसेवक उपस्थित होते.बैठकीतच श्रेयवादावरून जुंपलीनगरपालिकेतील या बैठकीतच भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार व कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांच्यात वारणा नळ योजनेवरून श्रेयवाद रंगला. त्यामुळे बैठकीत काही काळ गोंधळ उडाला होता. पोवार यांच्या म्हणण्यानुसार शहर विकास आघाडी सत्तेवर असताना वारणा नळ योजनेचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. तर पाटील यांनी, कॉँग्रेसच्या कालावधीतच वारणा नळ योजना प्रकल्प शासनाने मंजूर केला होता, असे म्हणणे मांडले. यावरून वाद झाला. त्यामध्ये अखेर खासदार शेट्टी यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला.इचलकरंजीतील नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत बोलताना खासदार राजू शेट्टी. यावेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर, सुनील पाटील, अशोकराव जांभळे, अजित जाधव, उपनगराध्यक्षा सरीता आवळे, नगराध्यक्षा अलका स्वामी, रवींद्र माने, मनोज हिंगमिरे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण